स्वातंत्र्यवीर सावरकर
मराठी मनावर सावरकर नावाचे एक गारुडच आहे . स्वा. सावरकरांचे भक्त असोत अथवा सावरकरांचे विरोधक असोत सावरकरांचे गारुड हे प्रत्येकावर असतेच . पण गम्मत अशी कि , सावरकर भक्तांना सावरकरांची त्रिखंडात गाजलेली ती उडी माहिती असते आन्दमान मधील सेल्युलर जेलमधील कोळू , छिलका माहिती असतो,पण सावरकर त्यांच्या पचनी पडलेले नसतात. तर विरोधकांना त्यांचे फक्त हिंदुत्वच दिसते त्या हिंदुत्वामागील महान तत्त्व समजून घेण्याचा त्यांनी कधी प्रयत्नच केलेला नसतो, याचे अत्यंत समर्पक वर्णन पु.भा. भावे करतात . " एक काळ असा होता ,कि जेंव्हा वि. दा. सावरकर हि अक्षरे केवळ स्वप्नातील आभासमय साक्षात्कारासारखी होती .तेंव्हा वि.दा. सावरकर हि केवळ गूढ मंत्राक्षरे होती . सावरकर म्हणजे सातासमुद्र पलीकडे झालेला भयानक स्फोट ! सावरकर म्हणजे तुफान दारियात उडी घेणारा ,दैवी दुनियातील वीर ! सावरकर म्हणजे महाभारतातून सजीव झालेले नवरसपूर्ण पान ! सावरकर म्हणजे सागर वेष्टित अंदमानातून निघत असलेली भेदक आरोळी ! सावरकर म्हणजे शौर्याचे,त्यागाच, स्वातंत्र्याचे,निराकार केवळ दिव्य असे प्रतीकच ! ".
या प्रतीकाने इहलोकात जन्म घेणे ,भारतमातेच्या उदरी जन्म घेणे आजन्म जन्मालाही नवलाईची गोष्ट ! या घटनेचे वर्णन करतांना भावे लिहितात, " हिमालयाचे माथे नम्र करील ,इतके उन्नत मस्तक घेऊन सावरकर जन्मले . विद्द्युलतेस निष्प्रभ करील,इतके तेज घेवून सावरकर जन्मले . वादळास स्तंभित करील इतकी गती घेवून सावरकर जन्मास आले . मेघ गर्जनेस मूक करील, इतका नाद घेऊन सावरकरांचा अवतार झाला . ज्यांचे बाह्य अंग अंतरंगाशी पूर्ण विसंगत आहे व ज्यांची प्रकृती आकृतीशी अत्यंत असंबद्ध आहे ,अशा लक्षावधी प्रतिमा घडविल्या नंतर जणू विध्यात्यास आपल्या कृत्रिम कैतावाचा जणू काही कंटाळा आला व त्याने एक अद्वितीय अशी नवीन प्रतिमा बनवण्यास घेतली .व त्यातून सावरकर जन्मास आले . " सावरकरांचे प्रत्येक अवयव न अवयव या आपल्याला काही न लाही सांगून जातो . त्यांचे नेत्र ! ती वस्तू अत्यंत अपूर्व व अवर्णनीय अशी आहे . त्यांचे ते नेत्र हे केवळ चार्म्नेत्र नाहीत तर ते तरुण हिंदुराष्ट्राचे ध्येय्दर्शी ध्रुव तारे आहेत . या सनातन भूमीची ती पेटती आंशा ज्योत आहे .धुम्सत असलेली ती स्वातंत्र्याची कल्पना आहे . अकाली विराम पावलेल्या हुतात्म्यांच्या नेत्रातील सारे भाव तेथे उत्कटतेने तेथे एकत्रित झाले आहेत . अल्पकाळ धडकून निघालेल्या ठिणग्यांनी सावरकरांच्या नेत्रात वस्ती केली आहे . विपुल्तेच्या पोटी जन्म लेल्या शतकांच्या अश्रूंचा सावरकरांच्या नेत्रात संचय झाला आहे . आणि म्हणून काळाला ,वार्धक्याला सावरकरांच्या नेत्रातील तपःसंपादित तेज मालविता आले नाही . सावरकरांचे नेत्र हे नुसते सावरकरांचे नेत्र नाहीत ; तर ते आपले भाग्य शोधावयास निघालेल्या हिंदुराष्ट्राचे नेत्र आहेत . सावरकरांचे कर्तुत्व हे अत्यंत अफाट आणि अत्यंत अविश्वसनीय असेच आहे .
आपली मात्रभूमी सावरकरांचे अवघे भावविश्व व्यापून राहिली होती . त्यामुळे त्यांनी आपले वक्तृत्व वाग्विभवती तिलाच अर्पिलेले होते. " सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरेतोवर झुंजेन " अशी सशस्त्र क्रांतीतून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सावरकरांनी अतिशय लहान वयात आपल्या देव्हाऱ्यातील अष्टभुजा देवी समोर प्रतिज्ञा घेतली होती . त्यांनी हे व्रत अंधतेने घेतले नवते ,तर हे सतीचे वान त्यांनी बुध्याची हाती धरले होते. सावरकरांची भूमिका हि वीरांची होती,झुंजाराची होती , ती भूमिका कष्टची होती . कष्टप्रद होती काट्या -कुट्यांनी व्यापलेली, एक चढणीची वाटच ते आयुष्यभर चढत रहिले. हि चढण चढतांना ते कधी दमले नाहीत, श्रमले नाहीत, पस्तावले नाहीत कि त्यांचे पाउल कधी बिचकले नाही . त्यांनी कधी सुख मागितले नाही .विश्रांती मागितली नाही ,मध्यंतराची याचना केली नाही असा अलौकिक गुण असलेला सेनानी राज्यकर्ता व्हावयास ते फार फार योग्य होते पण तशी भूमिका त्यांना कधी मिळालेलीच नव्हती . गांधीवाधोत्तर अभियोगाचे भयानक पाश ज्याच्या गळ्यावर फेकले गेले होते . केवळ परकीयांकडून नव्हे तर स्वकियांकडून ज्याची आणण्वी छळना झाली ,ज्याच्या स्पर्शाने एखाद्या सम्राटाचे सिंहासनही पूत झाले असते,ज्याच्या प्रतिभाशाली नेतृत्वाने राष्ट्राची भाग्ये पालटली असती परंतु आज जो सर्वस्वी एकाकी ,तरीही सर्वस्वी पूजनीय ,सदा प्रफुल्ल व सदा प्रकाशमान आहे ,तो हा ! पराभूत ? अपेशी ? छे ! छे !सावरकर कसले पराभूत ! सावरकर कसले अपेशी ? निष्काम कर्तव्य कधी अपेशी असते काय ? निरपेक्ष विरव्रत कधी पराभूत होते काय ? करंट्या वर्तमानकाळाने ते ओळखले नव्हते ,पण भाग्यशाली भविष्यकाळ ते निश्चितच ओळखणार आहे .
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी " स्वातंत्रलक्ष्मी की जय " हि घोषणा देऊन सशस्त्र क्रांतीचा केतू उभारला . अंदमानातील बंदी वासात त्यांनी अनेक हालअपेष्टा सोसल्या . नंतर रत्नागिरीतील कैदैत त्यांनी समाजिक कार्यांची मुहूर्तमेढ रोवली .मार्र्सेलेस ,अंदमान ,रत्नागिरी , येथे त्यांनी मृत्यूचे आव्हान अत्यंत सहजतेने परतवून लावले होते . पण १९६० नंतर त्यांची गात्रे आता थकली होती . सावरकरांनी त्यानंतर प्रायोपवेशन सुरु केले . सावरकरांना मृत्यूचे असे भयच नव्हते . मृत्यू जरी सर्वभक्षक असला तरी सावरकर हर मृत्युन्जय होते. दिवसचे दिवस ! आठवडेच्या आठवडे सावरकर अन्नपाणी न घेता ! आणि तरीही मृत्यू थबकत होता ,कचरत होता ,आज त्याला सावरकर मित्रत्वाचे आमंत्रण देत होते पुनः पुनः त्याचा हात ओढीत होते त्याला आपल्या कुशीत घेण्याचा प्रयत्न करीत होते . जनु काही मृत्युलाच आहे वाटत होते ., या विरात्म्याला आपण स्पर्श तरी तो कसा करवा ? या सुचीर्भूत तत्वज्ञानाच्या जवळतरी आपण कसे जावे ? या काव्यात्म्याला आपण निशब्द कसे करावे ? पंडिताच्या या महासागराला शुष्क करणार आपण कोण ? चैतन्याच्या या दिव्यावर आपण कशी फुंकर घालावी ? चलबिचल होती ती मृत्युच्या मनात सावरकर मात्र शांत होते. विद्यार्थीदशेत एका ध्येयासाठी मरणावर स्वारी करण्याचा उपदेश करणारा हा प्रेषित , प्रसंग आला तेंव्हा मृत्यूवरही चालून गेला .,त्याच शांत तत्वाने आणि धेर्याने .
सावरकरांच्या जाण्याने मात्र सर्वत्र अंधेर झाला . हिंदुस्थानचा व हिंदुत्वाचा एक अनमोल ठेवा हरपला .सावरकरांचे असणे हे केवेळ नुसते ' असणे ' नव्हतेच,सूर्याचे असणे ज्या प्रमाणे भव्यतेची कल्पना जागृत ठेवते ,सागराचे अस्तित्व ज्याप्रमाणे आपल्या सर्वसमावेशाची ,अथांगतेची चुणूक दाखविते , अगदी तसेच होते सावरकर एक अनंत काळ टिकणारे एक तेजोमयी,प्रेरणादायी नेतृत्व …!
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी " स्वातंत्रलक्ष्मी की जय " हि घोषणा देऊन सशस्त्र क्रांतीचा केतू उभारला . अंदमानातील बंदी वासात त्यांनी अनेक हालअपेष्टा सोसल्या . नंतर रत्नागिरीतील कैदैत त्यांनी समाजिक कार्यांची मुहूर्तमेढ रोवली .मार्र्सेलेस ,अंदमान ,रत्नागिरी , येथे त्यांनी मृत्यूचे आव्हान अत्यंत सहजतेने परतवून लावले होते . पण १९६० नंतर त्यांची गात्रे आता थकली होती . सावरकरांनी त्यानंतर प्रायोपवेशन सुरु केले . सावरकरांना मृत्यूचे असे भयच नव्हते . मृत्यू जरी सर्वभक्षक असला तरी सावरकर हर मृत्युन्जय होते. दिवसचे दिवस ! आठवडेच्या आठवडे सावरकर अन्नपाणी न घेता ! आणि तरीही मृत्यू थबकत होता ,कचरत होता ,आज त्याला सावरकर मित्रत्वाचे आमंत्रण देत होते पुनः पुनः त्याचा हात ओढीत होते त्याला आपल्या कुशीत घेण्याचा प्रयत्न करीत होते . जनु काही मृत्युलाच आहे वाटत होते ., या विरात्म्याला आपण स्पर्श तरी तो कसा करवा ? या सुचीर्भूत तत्वज्ञानाच्या जवळतरी आपण कसे जावे ? या काव्यात्म्याला आपण निशब्द कसे करावे ? पंडिताच्या या महासागराला शुष्क करणार आपण कोण ? चैतन्याच्या या दिव्यावर आपण कशी फुंकर घालावी ? चलबिचल होती ती मृत्युच्या मनात सावरकर मात्र शांत होते. विद्यार्थीदशेत एका ध्येयासाठी मरणावर स्वारी करण्याचा उपदेश करणारा हा प्रेषित , प्रसंग आला तेंव्हा मृत्यूवरही चालून गेला .,त्याच शांत तत्वाने आणि धेर्याने .
सावरकरांच्या जाण्याने मात्र सर्वत्र अंधेर झाला . हिंदुस्थानचा व हिंदुत्वाचा एक अनमोल ठेवा हरपला .सावरकरांचे असणे हे केवेळ नुसते ' असणे ' नव्हतेच,सूर्याचे असणे ज्या प्रमाणे भव्यतेची कल्पना जागृत ठेवते ,सागराचे अस्तित्व ज्याप्रमाणे आपल्या सर्वसमावेशाची ,अथांगतेची चुणूक दाखविते , अगदी तसेच होते सावरकर एक अनंत काळ टिकणारे एक तेजोमयी,प्रेरणादायी नेतृत्व …!
Grt
ReplyDelete