Sunday, June 1, 2014

विनायका प्राण तळमळला :Vinayaka Pran

विनायका प्राण तळमळला ………. 

           "सागरा प्राण तळमळला " म्हणत सावरकरांनी सागराला विनवणी केलीआता सावरकरांनाच एका कवीने केलेली विनवणी ……… 

       
ये समय तुझ्या अवतरणाचा  आला ,नरवरा प्राण तळमळला 
बघ त्रस्त किती झाली भारतमाता,  येईना जयश्री हाता !
फड्कून  नभी मुक्तीध्व्जा जरी आहे , कां नेत्रातूनी जल वाहे ?
नच राष्ट्ररती कुठे रतिभर दिसते , का ब्र्हम्लेखनी रुसते ?
स्वार्तांध  इथे सर्व धावती होती , ठावे नच  कोठे जाती?
             जणू ग्रहण लागले सूर्या रे !
             कि दुःस्थिती  नच परीहर्या रे ?
             तू येई पुन्हा नरवर्या  रे  !
जरी भाव तुला शब्दांवाचून कळला !!१!! नरवरा । 

धृतराष्ट्र इथे सर्व भासती साचे , कोणा न भान कोणाचे 
पांचाली हि भारत माता  भासे, अबलत्वं  तिला ते ग्रासे 
 हतशक्ती इथे भीष्म द्रोण जणू सर्व , वाढे दुःशासन गर्व 
कौरव कसे स्वजनही  इथे गमती, पांडवही द्युति रमती 
           तू कृष्ण होऊनी येई रे !
           तू एक आम्हा वर दायी  रे !
          बघ धीर खचोनी जाई रे !
येशील अशी आस लागली सकला !!२!!नरवरा …। 

मृग वर्मी जणू व्याध घाव हा बसला, कर्दमी जणू गज फसला 
वद आज तसे दुःखे व्याकुळलेले , कां हिंदुराष्ट्र हे झाले ?
आतंकाचा सर्प तसा फुत्कारी , विष त्याचे तर भय कारी 
भूमातेसी विळखा आजी तो घाली , प्रतीकार शक्तीही गेली 
         चेतना लोपली सारी रे !
         विष सुधारलतेसी मारी रे !
         तू होई शंभू कामारी रे !
तुजवीण कुणी पचवावे या गरला ?  !!३!! नरवरा …।   

  

2 comments: