विनायका प्राण तळमळला ……….
"सागरा प्राण तळमळला " म्हणत सावरकरांनी सागराला विनवणी केलीआता सावरकरांनाच एका कवीने केलेली विनवणी ………
ये समय तुझ्या अवतरणाचा आला ,नरवरा प्राण तळमळला
बघ त्रस्त किती झाली भारतमाता, येईना जयश्री हाता !
फड्कून नभी मुक्तीध्व्जा जरी आहे , कां नेत्रातूनी जल वाहे ?
नच राष्ट्ररती कुठे रतिभर दिसते , का ब्र्हम्लेखनी रुसते ?
स्वार्तांध इथे सर्व धावती होती , ठावे नच कोठे जाती?
जणू ग्रहण लागले सूर्या रे !
कि दुःस्थिती नच परीहर्या रे ?
तू येई पुन्हा नरवर्या रे !
जरी भाव तुला शब्दांवाचून कळला !!१!! नरवरा ।
धृतराष्ट्र इथे सर्व भासती साचे , कोणा न भान कोणाचे
पांचाली हि भारत माता भासे, अबलत्वं तिला ते ग्रासे
हतशक्ती इथे भीष्म द्रोण जणू सर्व , वाढे दुःशासन गर्व
कौरव कसे स्वजनही इथे गमती, पांडवही द्युति रमती
तू कृष्ण होऊनी येई रे !
तू एक आम्हा वर दायी रे !
बघ धीर खचोनी जाई रे !
येशील अशी आस लागली सकला !!२!!नरवरा …।
मृग वर्मी जणू व्याध घाव हा बसला, कर्दमी जणू गज फसला
वद आज तसे दुःखे व्याकुळलेले , कां हिंदुराष्ट्र हे झाले ?
आतंकाचा सर्प तसा फुत्कारी , विष त्याचे तर भय कारी
भूमातेसी विळखा आजी तो घाली , प्रतीकार शक्तीही गेली
चेतना लोपली सारी रे !
विष सुधारलतेसी मारी रे !
तू होई शंभू कामारी रे !
तुजवीण कुणी पचवावे या गरला ? !!३!! नरवरा …।
khupach chan
ReplyDeletekeep it up!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ReplyDelete