वाटचाल ……
आयुष्याच्या वाटचालीत
प्रत्येक वळणावर
कुणी न कुणी
भेटत राहिला
कधी देवदूत म्हणून
तर कधी यमदूत म्हणून
देवदूत विस्मरणात गेला
यमदूत मात्र चिरकाल लक्षात राहिला
फुलान्बरोबारच्या काट्यासारखा
सलत राहिला
फूल सुकून गेले
तरी बोचतच राहिला
मानवाचे जगणेही असेच आहे
सुख विसरायचे
अन दुःख उगाळायचे
अश्वत्थाम्याच्या फोडागत
आयुष्यभर जपायचे …….
(संकलित )
No comments:
Post a Comment