Sunday, June 15, 2014

अस्मान कडाडून गेला ..............

अस्मान कडाडून गेला .............. 

मराठी कवी मनमोहन यांनी सावरकरांची अजरामर उडी आपल्या हृदयस्पर्शी काव्यातून दाखवण्याचा केलेला एक प्रयत्न … 

गोदेच्या घाटावरले ,घट्टे पडलेले हात 
मोरिया बोटीवरती ,गुंतले कडी कुलुपात 
हेलकावत सागर होता , बिसकेच्या आखातात । । 

निबिडातून नैराश्याचा ।  मग प्रकाशरेषा दिसली । 
बोटीतील डेकावरती  वाटोळी खिडकी दिसली 
घेतला रोधुनी श्वास , संकुचित केले अंग । 
खिडकीवर धडकत होती उद्धट लाटांची रांग । 
त्या ताठ तुफानाहुनही , छाती याची उत्तुंग । 
देशाचा जयजयकार करुनी 
मारिला सूर वीरांनी 
टाकिले गगन भरोनि 
रवि शशी भंजनाला । अस्मान कडाडून गेला । 

कृष्णाच्या अन्गुलीवरच्या । चक्रापरी तो गरगरला । 
कर्णाच्या पृथ्वीवरल्या । गुंतल्या रथावर चढला । 
शिल्पकार संह्याद्रीचा 
भाष्यकार भवितव्याचा 
परमेश्वर हा प्रतिभेचा 
कल्पात  व्याह्ळून तरला । अस्मान कडाडून गेला 

अशी हि उडी बघतांना । कर्तव्य मृत्यू विसरला । 
बुरुजावर फड फडलेला। झाशीतील घोडा हसला । 
वासुदेव बळवन्तांच्या। कंठात हर्ष गद्गद्ला । 
क्रांतीच्या केतुवरला । अस्मान कडाडून गेला । 

फेसाच्या जाळ्यामध्ये दर्या चघळायासाठी  । 
बंदुकीची गोळी याच्या मस्तकास चाटून जाई । 
देशाच्या सेवेसाठी 
तोडिल्या जीवाच्या गाठी 
लावियले रक्त ललाटी 
ये भगवती राक्षयाला ।  अस्मान कडाडून गेला । 

चपलेच्या चंचल्याने 
पाण्यासी कापी  वेगाने
चुकवीत गोळ्या इर्षेने 
फ्रान्सचा किनारा भिडला । अस्मान कडाडून गेला  । 

या भूमीवरती आहेत विख्यात बहाद्दूर दोन । 
जे गेले आईकरिता । सागरास ओलांडून । 
हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान । अस्मान कडाडून गेला । 
    
      

No comments:

Post a Comment