आजकालच्या शहरी जीवनात राहणाऱ्या प्रत्येकाचाच आपलासा असा एक मातीचा गाव असतो , त्याची त्याला आवड असते ,ओढ असते आणि मनापासून जाण्याची सुप्त इच्छाही क़धि एकटा विचारात गढला कि येते त्याला आठवण त्या रमणीय दिवसांची पण तो आठवणीतच रमतो व शेवटी शहरी जीवनाच्या आरामात आपला गाव शोधतो असा सुंदर भावार्थ व्यक्त होणारी हि कविता …।
कितीतरी दिवसात
नाही चांदण्यात गेलो ;
कितीतरी दिवसात,
नाही नदीत डुंबलो
खुल्या चांदण्याची ओढ ,
आहे माझी हि जुनीच ;
आणि वाहत्या पाण्याची,
शिळ ओळखीची तीच
केंव्हातरी चांदण्यात ,
पुन्हा जाईन निर्भय ;
गावाकाठ्च्या नदीत ,
होईन मी जलमय
आज अंतरात भीती,
खुल्या चांदण्याची थोडी ;
अन नदीचा प्रवाह ,
अंगावर काटा काढी
बरा म्हणून हा इथे,
दिवा पारवा पाऱ्याचा;
बरी तोतऱ्या नळाची,
शिरी धार, मुखी ऋचा .
-{ बा. सी . मर्ढेकर }
संग्रहित
बालभारती इयत्ता आठवी
कितीतरी दिवसात
नाही चांदण्यात गेलो ;
कितीतरी दिवसात,
नाही नदीत डुंबलो
खुल्या चांदण्याची ओढ ,
आहे माझी हि जुनीच ;
आणि वाहत्या पाण्याची,
शिळ ओळखीची तीच
केंव्हातरी चांदण्यात ,
पुन्हा जाईन निर्भय ;
गावाकाठ्च्या नदीत ,
होईन मी जलमय
आज अंतरात भीती,
खुल्या चांदण्याची थोडी ;
अन नदीचा प्रवाह ,
अंगावर काटा काढी
बरा म्हणून हा इथे,
दिवा पारवा पाऱ्याचा;
बरी तोतऱ्या नळाची,
शिरी धार, मुखी ऋचा .
-{ बा. सी . मर्ढेकर }
संग्रहित
बालभारती इयत्ता आठवी
No comments:
Post a Comment