मैत्री केली आहेस म्हणुन सांगतो ........
गरज म्हणुन 'नात' जोडु नकोस
सोय म्हणुन सहज अस तोडु नकोस
रक्ताच नाही म्हणुन कवडी मोल ठरवु नकोस
भावनांच मोल जाण.. मोठेपणात हरवु नकोस
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नव नात जुळत असत
जन्मभर पुरेल इतक भरभरुन प्रेम मिळत असत
तुझी ओंजळ पुढे कर, कमिपणा मानु नकोस
व्यवहारातल देणघेण फक्त मध्ये आणु नकोस
मिळेल तितक घेत रहा , जमेल तितक देत रहा
दिल घेतल सरेल तेंव्हा... पुन्हा मागुन घेत रहा .
समाधानात तडजोड असते ...फक्त जरा समजुन घे
'नात' म्हणजे ओझ नाही , मनापासुन ऊमजुन घे
विश्वासाचे चार शब्द ...दुसर काही देउ नकोस
जाणिवपुर्वक 'नातं' जप , फक्त मांघार घेउ नकोस
~[ संकलित ]
No comments:
Post a Comment