Wednesday, May 28, 2014

नैनितालचा अनुभव

मी केलेला प्रवास …………. 

आजच्या धाकाधुकीच्या  आयुश्या मध्ये  प्रवास हा शब्द मनाला प्रफुल्लित करणारा आहे. प्रवासाने मनाला विरंगुळा ,समाधान,सुखशांती, असे सर्व काही मिळते त्यामुळे आपण ताजेतवाने होऊन येणाऱ्या कार्याला पुरून  उरतो .प्रत्येकाने एकदातरी प्रवास अथवा पर्यटन हे केलेलेच असते त्यप्रमाणे मीही यावेळेस वडिलांसोबत प्र्यातानास गेलो होतो ते 'झीलों कि राणी नैनितालला ………।                                                                                                                                    आजच्या धाकाधुकीच्या आयुष्यात दररोजच्या तापमान बदल मुले मानव फारच वैतागला आहे .त्याला कुठे  न कुठे तरी निसर्गाच्या सानिध्याची आवश्यक्यता भासू लागली आहे त्यामुळेच तो शोठेथे जाऊन मनास  तृप्त करून घेतो.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही पर्यटनास जाणार होतो पण नैनिताल काहीतरी वेगळे आहे असे मला नेहमी वाटायचे.ज्या प्रमाणे गीरीप्रेमिना हिमालय खुणावतो त्याप्रमाणे मला देखील  नैनिताल खुणावत होते. दिवस  ठरला ७ मे २०१० सर्व प्रकारचे ट्रेन चे तिकीट  बुक झाले व माझ्या  आनंदाला  उधाण आले. जसा जसा प्रवासाचा दिवस जवळ  येऊ लागला तसा तसा माझ्या मनातला आनंदरूपी वारा माज्या  मनाला गुदगुल्या करून मला प्रवासाची आठवण करून देत होताऽअनि तो ७ मे उजाडला आज आनंदाच्या भारत मी काधीनावव्हे ते लवकर उठलो व  सर्व कामे आटपून सर्वात आधी   तयार झालोंअनत आनंदाची लकेर घेऊनच आम्ही नांदेडच्या  त्या रेल्वेस्थानकावर  आलो तेंव्हा 'सचखंड ऎक्स्प्रेस आमच्या स्वागता  साठी जणू काही सज्जच होती अत्यंत आनंदात आम्ही सर्व गाडीत बसलो व काही वेळातच गाडीने नांदेड सोडले व आमच्या आनंदाला पारावर उरला नाही दरमजल  करत आम्ही जालन्याला पोहचलो तेथे माझी बहिण आमच्या सोबत सामील झाली. रेल्वेच्या खिडकीतून बाहेरच्या जगाची अनुभूती घेत आम्ही प्रवास करत होतो व दुसऱ्या दिवशी दुपारी १:३० वाजता आम्ही दिल्लीला उतरलो . दिल्ली भारताच्या राजधानी चे शहर  अत्यंत रुबाबदार दिसत होते.तेथिल गर्मी, गर्दी, ऊन  यामुळे सुरुवातीला थोडा गोंधळ उडाला पण त्यामुळे तेथे राहत असलेल्या लोकन्बध्ल एक विलक्षण आदर निर्माण झाला    जसे जसे आम्ही पुढे  जाऊ लागलो तसे तसे आम्हाला दिल्लीच्या  प्रेक्षणीय स्थळांची महती कळू लागली . त्यावेळेस प्रथमच आम्ही मेट्रोचा अविष्कार पहिला . त्यानंतर आम्ही इंडिया गेट  इथे गेलो.तेथे गेल्यावर आम्हाला शहीद हिंदुस्थान वासीयांची आठवण आल्यावाचून राहिली नाही. त्यनंतर दिल्लीतली  मज लुटण्यात आमचा दिवस कसा गेला हे कळलेच नाही .त्य दिवशी रात्री आम्ही 'रानीखेत एक्स्प्रेसने ' काठगोदाम येथे आलो .दिवसभर फिरून आल्यामुळे रात्री कधी झोप लागली हे कळलेच नाही. व सकाळी साडेसात वाजता आम्ही सर्व काठगोदाम येथे पोहोंचलो क़थ्गोदम या गावाचा अर्थ त्याच्या नावाप्रमाणेच होतो.एका  बाजूला विशाल सपाट मैदान तर  दुसर्या बाजूला गगनचुंबी पर्वत असे ते विहंगण दृश्य होते ऽअम्हि तेथे उतरलो तेथून नैनिताल ला जाण्यासाठी भरपुर  प्रमाणात  टॅक्सी असतात . तेथूनच आम्ही एक   टॅक्सी बुक केली व त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासास निघालो .
                                        टॅक्सीमधील चालक फारच हुशार होता त्याने जाताना आम्हाला बर्याच वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती सांगितली ख़रतर  काठगोदाम ते नैनिताल हे अंतर ३६ किमी एवढेच होते परंतु घाटाच्या प्रवासमुळे आम्हाला ते अंतर पार करायला सुमारे एक तास लागला .एक बाजूला खोलच खोल दरी तर दुसर्या बाजूला उंचच उंच कडे अशा विहंगम दृश्यातून आम्ही पुढे पुढे जात होतो निसर्गाची  ती अद्भुत किमया भघताना  नैनिताल कधी आले ते आम्हाला कळलेच नाही नैनीताल  हे गाव अतिशय सुंदर असेच आहे ,हे गाव चार डोंगरांच्या मध्ये वसलेले असून त्यामध्ये एक सुंदर झील आहे. त्या झील चे नाव नैना झील असे असून .त्य झिल्च्या काठावरच नैना देवीचे मंदिर आहे व तसेच एक गुरुद्वारा सुद्धआ  आहेय़ झील चा आकार पूर्वी डोळ्यांसारखा होता त्यामुळे यास नैना झील असे म्हणत असत परंतु कालांतराने या झिल्च्या पश्चिमेकडील बाजू कोसळल्या मुले याझीलचा तो आकार बदलला व सध्या तो आंब्यासारखा झाला आहे . नैना झील हे सुमारे १२० फुट खोल असून त्यातील बोटिंगची मज काही औरच आहेंऐनितल हे गाव शिवालिक पर्वत रांगेत येते या पाव्तीय भागात मुख्यत्वे पाईन, देवदार ,ओक  यांसारखा वृक्षांची वने आढळतात य़ पर्वतीय भागाच्या पायथ्याच्या भागात सागवान वृक्षांचीही वने आढळतात

नैनिताल हे समुद्र सपाटीपासून सुमारे २००० मीटर उंचीवर आहे म्हणजेच ६००० फुट आहे . आम्ही दोन दिवसाच्या प्रवासातून जरी थकून आलेलो असलो तरी तेथे पोहोण्चल्यावर  आमचा थकवा चाक्क्चुर झाला . अत्यंत आनंदात आम्ही हॉटेल 'सिलबटन ' मध्ये प्रवेश केला . या हॉटेलला अत्यंत सुंदर असा व्हिव्ह्यु लाभला होता अगदी नैना झिल्च्या समोर असे ते हॉटेल होते .त्यदिवशी आम्ही लांबच्या प्रवासातून आलेलो असल्या मुले आम्ही  शहर नजीकची धीकाने पाहण्याचे ठरवलेले .त्या दिवशी आम्ही नैना झील मध्ये बोटिंग केली . या सुंदर अशा तलावाचा  स्पर्शदेखील मन प्रफुल्लित करणारा आहे . त्यानंतर आम्ही जवळच्या मालरोड ( बाजाराचे ठिकाण ) येथे गेलो . नैनितालचे  ते सौंदर्य भाघ्ण्यात आमचा तो दिवस कसा गेला ते कळलेच नाही .
दुसर्या दिवश आम्ही सकाळी जर लवकरच उठलो व अत्यंत आनंदात कुडकुडत तयार झालो कारण त्या दिवशी आम्ही जाणार होतो ते हिमालय दर्शन व नजीकच्या प्रेक्षणीय सरोवारांना. सकाळी ७ वाजताच आमचा वाहनचालक आला व त्याननंतर आम्ही निघालो .त्याला तिथल्या वातावरणाचे खूप ज्ञान होते व त्याचा फायदा आम्हा सर्वांना होत होता . सकाळी वातावरण चांगले असल्यामुळे आम्ही सर्व हिमाय दर्शनाच्या ठिकाणी गेलो हे ठिकाण नैनिताल पासून सुमारे २०० मिटर उंचीवर असून या ठिकाणावरून हिमालयाचे  दर्शन होते . अत्यंत आनंदात  आम्ही सर्व त्या पोइन्त्च्य दिशेने  जात होतो अगदी काही व्लेतच आम्ही त्या पोइन्त्वर पोहोंचलो व त्याचवेळी समोर दिसणा तो शुभ्र बर्फ प्फुन आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले . ती पर्वत रंग त्या शुभ्र कांती मुले व त्यावर पडणार्या चमकदार  सुर्याकीरणामुळे  झळाळून उठली होते .ते वैभव पाहून आम्ही शतशः निसर्गाचे    आभार मांडले व तेथून निघालो. आम्ही मनालीलाबर्फावर चालण्याची मज अनुभवली होती परंतु दूरवरून तिला पाहण्याची मज काही  औरच होती .तिथले  सौंदर्य  डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो .त्यनन्तर आम्ही खूप उंचीवर असणारे एक ठिकाण पहिले . तेथून दिसणारी ती खोल दरी पाहून मन भयग्रस्त झाले होते . त्यानंतर आम्ही पुढे ' बारा पथ्थ र ' हि शीला पहिली तो एक अतिउंच खडक  असून तो मोठ्या प्रमाणात ट्रेकिंगसाठी वापरला जातो .तेथुन खाली दृष्टी टाकल्यास एक गाईच्या पावलाच्या आकाराचे एक सरोवर दिसते . ते सरोवर अत्यंत निळाशार अश्या पाण्याने बनलेले असून त्याचा सहवास सुधा मन प्रसन्न करतो . या सरोवराचे वैशिष्ठ्य असे कि ते वर्षातून तीन वेळा त्याचा रंग बदलते .
                                                                                   ते विलोभनीय दृश्य पाहून आम्ही पुढे केव्ह गार्डन पाहण्यासाठी निघालो . हे गार्डन म्हणजे विविध गुहांचा समुदायच आहे . यात चित्ता , वाघ, अस्वल,साळींदर, सिंह, यांसारख्या प्राण्यांच्या गुहा आहेत . या गुहांमधून   फिरण्याची मज फारच विलक्षण आहे . यात काही गुहांमध्ये तर झोपूनच जावे लागते . या गुहांमधील खडक अत्यंत थंड असून जुनुकाही आपण एसी मध्ये बसलो आहोत असा भास होतो . वन्यजीव प्रेमींसाठी हे जागा अतिशय सुंदर आहे .



निसर्गाची ती किमया बघून  आम्ही पुढे निघालो .अतिशय हिरवेगार असे डोंगर व त्यामध्ये असलेले नितांत सुंदर झील पाहून मन अगदी भरून जात होते . निसर्गाने केलेली ती मज पाहताना
                  "हिरवा निसर्ग हा भवतीने,जीवन सफर करा मस्तीने "
                                     या ओळींची आठवण आल्यावाचून राहिली नाही  निसर्गाची जादू भघण्यात आमचा पुढचे ठिकाण म्हणजेच "सात ताल "कधी आले ते कळलेच नाही . सात ताल हे नैनिताल प्रमाणेच एक सरोवर असून ते सुद्धा सुमारे १२० फूट खोल आहे . या तलावात  सुद्धा आपल्याला बोटींगची मजा  अनुभवता येते . तेथे विविध सुंदर देखावे  सुद्धा उभे केले आहेत ते अतिशय नयनरम्य आहेत . तेथील नैसर्गिक सौंदर्य पाहून आम्ही पुढे " नाकुचीयाताल " येथे आलो. हे सुद्धा एक सरोवर असून ते सर्वात खोल आहे . या सरोवराला नऊ कोण असल्यामुळे याचे नाव " नाकुचीयाताल " असे पडले या विशाल सरोवराची खोली सुमारे १९० फुट आहे . नैनितालच्या भागातली हि सरोवरे एक प्रकारच्या भौगोलिक प्रक्रियेतून तयार झलेली आहेत . पावसाचे , तसेच नद्यांचे  पाणी दर्यांमध्ये साठत जाते व त्या दर्याचे मुख डोंगरांच्या पडझडींमुळे बंद झाल्या मुळे ते पाणी साठून अशी सरोवरे निर्माण होतात .त्यानंतर आम्ही निसर्गाची किमया भघत व पाईनची फुले वेचत आम्ही पुढे जात होतो . हि फुले अत्यंत आकर्षक असतात . ती वाळलेली फुले जुनू काही सुताराने केलेल्या नाक्शिकामासारखी असतात . तेथे नैनितालला ती फुले आकर्षक रंग व आकारात विकावयास असतात  . आम्ही जवळपास एक पिशवीभर फुले गोल केली . हि फुले वेचातच आम्ही भीमतालला गेलो.  भीमताल हे  एक सरोवर असून ते  नैना झील प्रमाणेच होते .भीमताल हे नाव भीमाच्या नावावरून पडले असून तेथे जवळच भीमाचे व महादेवाचे मंदिर आहे . अशी अख्याइका आहे कि भीम वनवासाच्या काळात येथे महादेवाची पूजा करत असे व त्यानेच हे देउळ  बांधले . भीमताल हे सरोवर सर्वात प्राचीन सरोवर असून ते नैनिताल च्याही पूर्वीचे आहे . येथे विविध प्रकारचे पक्षी दिसतात त्यांच्या रमणीय किलबिलाटात   हा परिसर अत्यंत विलोभनीय दिसतो . येथे इतक्या उंचीवरही माश्यांच्या विविध प्रजाती दिसून येतात . भिमतालचे ते विअत रूप पाहून आम्ही परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो . नैनितालला   आम्ही जैन्व्हा पोहोंचलो तोपर्यंत रात्र झाली होती . रात्रीच्या  वेळी नैनितालचे  ते वैभव सुवर्ण लंके सारखे दिसत होतेऽअज्चि दृश्ये आठवण्यात व उद्याची स्वप्ने रंगवण्यात रात्र कशी सरली ते कळलेच नाही .
                                                                                त्यानंतरच्या दिवशी आम्ही सार्वजण रानीखेत भघ्ण्यासाठी  निघालो . रानीखेत हे नैनिताल पासून ६० किमी दूरीवर असून ते अत्यंत सुंदर आहे रामिखेतला जाण्यापूर्वी आम्ही कैंची धाम येथे गेलो . तो परिसर अतिशय मनमोहक व सुंदर आहे . येथे असणार्या मंदिरातील स्वच्छता ,पवित्रता  पाहून आम्ही भारावून गेलो . रमणीय मंदिर , नदीचा येणारा  हळुवारसा आवाज , सभोवतालचे उंचच उंच पर्वत व त्यावरील हिरवा निसर्ग पाहून मन खरच मोहून जाते वाटते कि तिथेच राहावे . तेथे थोड्यावेळ व्यतीत करून आम्ही पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो . जवळच एक नैसर्गिक ठिकाण होत ते म्हणजे बेडकाच्या आकाराचा नदीतील दगड . हा दगड नदी पात्रात अगदी मधोमध आहे व  त्याला आदळून पुढे जाणारा प्रवाह अत्यंत सुंदर दिसतो . पाणी उथळ असल्यामुळे आपल्याला त्या दगडापर्यंत जाता येते व  तेथे फोटोदेखील काढता येतात . हा सुंदर परिस पाहून आम्ही रंखेत काढे निघालो . रानीखेत हे गाव सुमारे १८०० मीटर उंचीवर असून ते एक प्राचीन शहर आहे . येथे असणार्या राणीच्या प्रीत्यर्थ या शहराला रानीखेत असे नाव पडले . इथे भारतीय लष्कराचे कॅम्प  सुद्धा आहेत . येथील गोल्फ गार्डन  देखील फार  प्रसिध्द आहे . येथे विविध राष्ट्रीय स्पर्धादेखील होतात . हि जागा ब्रिटीश काळात विकसित झाली . येथे मिल्ट्रीसाठी एक ध्यान मंदिर उभारले आहे त्याचे नाव आहे मन कामेश्वर मंदिर या मंदिराची स्थापना १९९३ मध्ये झाली . हे मंदिर अत्शय भव्य,शोभनीय , व मन प्रफुल्लीत करणारे एक जागृत स्थान आहे . रानीखेत मधून हिमालयाच्या रंगांचे दर्शन होते . तेथून आम्ही कालिका देवीचे मंदिर भाघ्ण्यास गेलो . तेथे जवळच एक चिल्ड्रन पार्क आहे . तेथे आम्ही सर्वांनी खूप मौज लुटली व परतीच्या प्रवासास लागलो ,.
                                                                       नैनिताल ला आल्यावर आम्ही शोप्पिंग केली . तेथे मेणाचे विविध प्रकार मिळतात उदा . मेणाचे दिवे, पुतळे ,शोभनीय आकर्षक वस्तू ,अश्या विविध गोष्टी मिळतात . तेथे खाण्यासाठी विविध प्रकारचे चाट धेखील मिळतात . त्या दिवशी त्या चविष्ट चाटचा    आस्वाद घेऊन आम्ही  आमच्या रूम वर आलो. रात्री जेंव्हा झोपण्याचा प्रयत्न केला तेंव्हा मात्र झोपच येईना कारण आम्ही दुसर्या दिवशी परतीच्या प्रवासासाठी निघणार होतो. इतके दिवस अनुभवलेली ती गुलाबी ठुंडी आता आम्ही अनुभवणार नव्हतो तर आता आमच्या भेटीला पुन्हा तो आग ओकणारा सूर्य येणार होता या विचाराने मन व्याकूळ झाले. परंतु निसर्गाचे ते अचाट वैभव मला पाहता आले म्हणून मी त्या निसर्गाचे शतशः आभार मानले . आजून एक आनंदाची बातमी बाकी होती ती म्हणजे आम्ही आम्ही मुक्तेश्वर ला जाणार होतो .
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच नैनिताल सोडले  नैनिताल्चे  ते सौंदर्य  आम्ही  सोडून जात होतो या विचाराने मन भरून गेले . मुक्तेश्वर येथे शिवाचे मंदिर असून ते सुमारे ३५० वर्ष जुने आहे . ते मंदिर त्या गावाच्या सर्वात उंच ठिकाणी असून त्याची उंची सुमारे २२८६ मिटर एवढी आहे म्हणजे नैनिताल पेक्षा उंच . हि जागा अत्यंत प्राचीन सुधा आहे . पांडव स्वर्गारोहिनीला जाताना येथून पुढे मार्गस्थ झाले असे मानण्यात येते .



मुक्तेश्वर येथे बर्याच फिल्मचे शुटींग सुद्धा झालेले आहे . येथील एक कडा अत्यंत प्रसिद्ध असून तेथील उंची सुमारे २८०० मीटर एवढी आहे . तेथे ब्रिटीश कालीन संग्रहालय सुद्धा आहे . मुक्तेश्वर येथून जिम कार्बेट पार्क सुद्धा   जवळ आहे  अशाप्रकारे मुक्तेश्वर चे ते दैदिप्यमान रूप पाहून आम्ही परत काठगोदाम ला आलो . मनात खूप कालोहाल चालू होता . पुन्हा आपल्याला येथील मज अनुभवता येणार नाही म्हणून मनात आश्रू पाझरत होते . त्या दिवशी मी त्या पर्वत रांगेच्या पायथ्याशी  कृतज्ञ झालो . व मनाला समजावले कि तुला परत या निसर्गाच्या कुशीत यायचाच आहे, येथील निसर्गाच्या  ओंजळीत बागडायचय  य़ेथिल रम्य वातावरणात तुला खुशाल डुंबायचय कारण तुला परत यायचय ,तुला परत यायचय ………।
                                                                                           - वेदांत तळणीकर 















Saturday, May 3, 2014

काव्यसंग्रह

शाळेचे ते दिवस …………। 

शाळेचा तो पहिला दिवस 
न विसरला कधी 
डोळ्यात येत होती आसव घरी जाण्यासाठी …… 

काही काळ झाला …।
 शाळेची माया कळू लागली 
आईसारखी काळजी  घेणारी 
शाळाच वाटू  लागली

शाळेच्या सानिध्यात वाढताना 
मिळाला आनंदाचा ठेवा 
शाळेतील अमोल शिक्व्नींनी 
केला आमच्या आयुष्याचा मेवा 

 अाचाय्रांच्या मार्गदर्शनात 
घडत आलो आम्ही 
आमच्यातील कला गुणांना 
वाव दिला तो केवळ शाळेने 

आज आमचा शेवटचा दिवस 
मन खूप भरून आलंय … 
डोळ्यातून बाहेर पडण्यापूर्वीच 
शब्दांमधून पाझरु लागलंय 

शाळेतील आठवणींनी 
तळमळतो प्राण माझा 
हळहळते कविता माझ्यातली 
शाळेपासून दूर जाताना 

शाळेच्या शेवटच्या दिवशीही 
दिलासा वाटतो एका गोष्टीचा 
मिळतो एक आत्मविश्वास 
स्वताच्या पायावर उभा राहण्याचा 

म्हणूनच सांगतो मित्रांनो 
विसरू नका शाळेला 
शाकेविना अर्थ नाही 
तुमच्या या जगण्याला